Saturday, April 25, 2020

One more messed-up painting.


That day, I was just sitting in my bedroom.Thinking about what next task to be done in this lock-down period. And suddenly one blank paper come across me. I took it in my hand. I rolled my fingers over it.A really good texture paper. It was bright. It was a good dimensions big paper with all the best qualities.The same paper I have seen once before few days and wished if I can get the same so I can create a beautiful painting for my vacant wall in the hall. Today, looking at the same paper in my hand I was very happy.I smiled at it.And asked it,
" Now whats next? You are really very good. But I am not that good artist."
The paper looked at me. smiled and expressed its desire,
"Ohhh! But I want you to add colors of your expressions on me. I liked you as an artist...as a friend...I want you to enter in my life and have good time.Let's come together...I am sure we can together create beautiful memories. We both can share the moments which will be precious for both of us."
I was already impressed by it from long before, so couldn't stop myself from going ahead. Although, I came to know that this painting cannot decorate my house. Still I was very happy to get it. I hugged it and took it in my room. At first, I drew one perfect circle in the middle of it. i was planning to work only in that circular area.But somehow my paper was not happy to knew this idea. For a moment, it stopped me,
"Rupali, what are you doing? why this boundary? I want you to get completely involved in me as I am devoted to you now. Today, I am here only for you. I am yours...believe me ,completely yours. "
"Are you sure? completely?"
I asked this question focusing on the word 'completely'.And on that it clarified one thing,
"Yes, I agree that even I have some limits. we can't go beyond that.But still I can assure you that we will have a very good time together.We will spend time with each other. I will agree to your that circular boundary also. Will not try to convince you to go beyond that.I respect your feelings. so, Let't enjoy the present. I am sure you will feel good. I want to see you happy."
And with this, our journey started together. Both of us were very comfortable with each other. One quiet communication started in between us. As I am very moody, everyday some different emotion was playing its role on that blank space. sometimes freshness of green started our day in early mornings, sometimes Reddish shades showed any anger whenever present, yellow smiles all over the body and sometimes the calm bluish violet shades in the night but the white color of purity was always there...so many colors started flowing one after another. Days passed by and our relation got stronger. Whatever I used to feel , I used to express through my strokes.With every stroke that painting started giving me positive response. Yes, now slowly that blank paper started it's journey towards a beautiful painting. I was also so much involved in that painting. There were so many works from office as well as household chores I needed to manage, but  I was always thinking about the incomplete painting I had. One day I realized now the painting is complete.We should stop experimenting more. but the painting was not at all happy to know it.It wanted something more.It was trying to convince me to go beyond your limits in order to complete. But I took it in other way and I started overworking in that completed circle again. And what happened? the newly drawn stroke just messed up my whole painting. It created one wrong mark and the beauty suddenly deteriorated.I felt very bad. But don't know what to do? Now my painting again started looking like incomplete.Something more was needed now. But what?

The painting was witnessing the whole process and it gave me suggestion,
" Why don't you utilize the remaining space to complete our painting. there is lots of space around that circle where if you wish you can enter and make the painting more beautiful. You can add new colors, new shades, new ideas...all these will surely change the view. I knew you had that imaginary boundary line in between. But  just try to cross that and go ahead. You will not regret."
That time I realized it is very difficult to explain. So I said,
" OK, as per your wish, if I cross that boundary and entered in the white space. what is the the guarantee that the painting will not mess up again in future. That time it will be more painful as I would have been utilizing more time and resources behind it. And there are my own rules which are stopping myself. And if I get involved completely and started listening my heart more than brain then it might happen that even your boundaries can't stop myself from entering...afterall flow of colors and emotions are free to move. I want this painting to be remain as it is in between us as a beautiful memory of sharing."
On this, it was speechless. May be don't know the answer or got angry. He just get away from where we were.Now I am sure that I have messed up the painting almost completely. And that painting is not even allowing me to go ahead.It stopped giving any response to my expressions. After few unsuccessful attempts, even I am loosing confidence now. I miss that beautiful relation among us ,the healthy communication , the love and care we both had for each other. But I think that painting lost interest or don't have any hopes from my art.What I could do? Shall I forget it forever? No Never...It can't happen. Because whatever I achieved, I learnt is a treasure. So shall I cross the boundaries? No it will mess up the painting more. So what I can do?

I kept on thinking without any output. Tried to get brand new good papers from cupboard and started working over that...but don't know why I couldn't concentrate on anything else. Even when same colors and shades are used ,the same communication, emotions were not possible this time. I also tried to open the similar old messed up paintings but no use. They all have no future even if I try my best. 

Don't know, if that messed up painting will come across again in my life and continue with the same friendship we had developed so far and help me in completing our painting. At least the same response, the same care and love....Nothing more and nothing less. It is always true that anything including a painting can get messed up when its overworked or is remained incomplete. But sometimes, truly speaking it feels like it was just a beautiful dream which broke after the night. I can't believe on my art that such a great paper can come across myself and ask me to own it. Even if its not a reality, I loved that dream and wish to be always live in that dream  forever with the same old beautiful colors and a healthy communication. Even if that painting will be not with me I will always try to enhance its beauty in my imaginations in my own world of dreams.
Because each painting is so special for its creator. It teaches and gives a new experience in the life to deal with new challenges coming towards in near future. 
But still one question remains unanswered...Why every time the painting gets messed up like this?


-Rupali Thombare.

Friday, April 24, 2020

तो... आणि ती (भाग ११)



बाबांनी दार उघडलें. समोर सार्थक त्याच्या आईबाबांसमवेत उभा होता. बाबांचा हसतमुख चेहरा अगदी क्षणभरासाठी विचलित झाला. यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते आहे असा विचार करत बाबानी किंचित चष्म्याची काच व्यवस्थित करून समोर उभ्या मंडळींना नीट निरखून पाहिले.पण काही आठवत नाही तेव्हा ते लगेच भानावर आले. आणि आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करत त्यांना आत घेतले. निर्वीची आईसुद्धा तोपर्यंत तिथे पोहोचलीस होती. पण आलेल्या पाहुण्यांना पाहून ती चपापलीच.तिच्याही नकळत ती पुटपुटली ,
" आता ही बाई या वेळेला इथे कशी काय?"
" आई, काय झाले?"
पाण्यानी भरलेले ग्लास ट्रे मध्ये घेऊन येणाऱ्या वहिनीने लगेच आईंना असे गोंधळलेले पाहून प्रतिप्रश्न केला.
" अगं, काही नाही. पाणी दे त्यांना."
असे म्हणून आई पुन्हा हसतमुखाने पाहुण्यांना सामोरी गेली.
" निर्वीच्या आई , घर अगदी छोटंसं असलं तरी खूप चांगल्या रितीने सजवलंय हां तुम्ही. छान."
ते ऐकून निर्वीच्या आईच्या कपाळावर आठ्याची किंचित लकेर उमटली. देशमुख बाईंच्या बोलण्याला टोमणा समजावे कि स्तुती हेच तिला कळेना. पण थोडे गोड बोलून ही वेळ मारून घेऊ आणि या पाहुण्यांना परतीला पाठवावे असा विचार गोदावरीबाईंच्या मनात तरळून गेला आणि कपाळावरची ती रेषा कुठल्या कुठे हरवून गेली.कारण तिला निहाल आणि निहालच्या घरच्यांच्या स्वागतासाठी तयार व्हायचे होते. काही काळ शांतता पसरलेल्या त्या वातावरणात आतली कुजबुज जाणवू लागली. आत निर्वी तयार होऊन बाहेर येण्यासाठी उत्सुक होती पण आईच्या सांगण्यावरून वहिनीने तिला थांबवून ठेवले होते.
" अगं वहिनी , काय झाले आहे ? तो आला आहे ना ? मग झाले का तुमचे पाणी वैगरे देऊन. त्यानंतर माझी एन्ट्री होईल असेच ठरले होते ना आपले.... "
"निरू, हो गं. पण ना बाहेर तो आलेलाच नाही. कोणीतरी वेगळेच पाहुणे आले आहेत.असे एकंदरीत आईंच्या वागण्यावरून जाणवले मला. "
"काSSS य ? कोण ?"
" नक्की नाही माहित. पण आई ओळखतात त्यांना. आई बोलत आहेत त्यांच्याशी. तुला पण ओळखतात ते."
" ह्म्म्म... कोण असतील? आणि हीच वेळ मिळाली का त्यांना. मग वहिनी, आत्ता ?"- निर्वी.
" निरू, तू ती काळजी करू नकोस. आई प्रयत्न करत आहेत. ते बरे झाले ठरलेल्या पाहुण्यांना जरा उशीरच होतो आहे ते. "
वहिनीचे बोलणे ऐकून निर्वी पुन्हा एकदा संभ्रमात पडली. अर्ध्या तासापूर्वीच सार्थकचा मेसेज आला होता. ते घरातून निघाले असल्याचे त्याने कळवले होते. त्यांचे घर इतकेही दूर नाही. मग इतका उशीर कसा होतोय? आणि त्याबद्दल काही सांगितलेही नाही. आणि नेमके आत्ता कोण तडमडले असणार? आपले जुने ओळखीचे ... ? कोण ? अशा प्रश्नांमध्ये निर्वी हरवून गेली होती. बाहेर सुरु असलेली बोलणी कानांवर पडत असली तरी त्यातून काहीच तर्क काढता येत नव्हता. हातात घेतलेल्या फोनवर अचानक सुरु झालेली स्पंदने जाणवली आणि ती शहारली.
'इंतेहा हो गयी इंतजारकी...आयी ना कुछ खबर मेरे यारकी'
सार्थकचा या अशा प्रसंगी आलेला हा मेसेज पाहून ती जराशी चक्रावलीच. पुढे विचारांची गाडी पुढे सरकेल तोच त्याचे पुढचे मेसेजेस न थांबता येत गेले आणि ती डोळ्यांची पापणीही न लावता ते वाचत गेली.  
" अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही तुमच्या येण्याची."
" किती तयार होशील. तू कशीही तयार झालीस तरी छानच दिसशील.'
' ये ना लवकर बाहेर.'
'खूप आतुरतेने तुझी वाट पाहतो आहे मी.'
आता निर्वीच्या जरा जरा लक्षात येऊ लागलं आणि ती ताड्कन उठून उभी राहिली.
" निरू काय झालं गं ?"
"वहिनी, नक्की सांग. बाहेर कोण आलं आहे ?" ती अगतिकतेने विचारू लागली. 
" अगं , खरंच मी पूर्वी नाही पाहिलं त्यांना कधीच. तुमचे जुने ओळखीचे आहेत. त्यांच्या गप्पांवरुन तरी इतकेच जाणवले कि तो मुलगा आणि तू एकाच शाळेत शिकत होतात आणि आता तो परदेशात असतो म्हणे. तोच आता बऱ्याच वर्षांनी आला आहे परत म्हणून भेटण्यासाठी आले ते असेच सांगितले त्या बाईंनी. फारच फॅशनेबल बाई वाटली ती मला तर....पण तू नकोस काळजी करू. तुझे पाहुणे येण्याआधी आई नक्कीच त्यांना परत पाठवेल बघ."
हे ऐकून निर्वी धीम्या आवाजात पण शक्य तितके ओरडून सांगू लागली,
" अगं वहिनी, हा तोच मुलगा आहे... सार्थक."
" हो हो सार्थक असेच काहीसे नाव सांगितले तेव्हा त्यांनी."
निर्वीचा चेहरा रडकुंडीला आला होता.
" ते लोक माझ्यासाठी तिथे ताटकळत बसले आहेत कधीपासून आणि मी? मी, इथे काय करते आहे? आईला बोलावं तू पट्कन.तिचे काय सुरु आहे कळतच नाहीय.सार्थकच येणार हे माहित होते ना तिला?मग ती अजून कुणाची वाट पाहत बसली आहे ?"
वहिनी, बाहेर जाऊन आईला बोलावणार तोच तीच लगबगीने आत आली. आणि निर्वीला म्हणाली,
" आपले पाहुणे अजून तरी आले नाहीत. पण आयत्या वेळी त्या देशमुखबाई आल्यात बघ आपल्या परदेशातून परतलेला मुलगा दाखवायला.उगाच फुशारक्या मारायची सवयच आहे त्या बाईला.  मी बराच प्रयत्न केला पण ते लोक तुला भेटल्याशिवाय जाणार नाहीत वाटते. म्हणून तू जा आणि थोडे बोलून ये. आणि जरा त्यालाही फोन करून बघ कि ते कधी येत आहेत. इतका उशीर का झाला?"
निर्वी आणि वहिनी दोघेही स्तब्धपणे उभ्याच  होत्या हे बोल ऐकून. निर्वीला काहीच उमगत नव्हते कि आई अशी का वागते आहे ते. आणि वहिनीला इतके मात्र कळून चुकले होते कि आपले चुकून काहीतरी नक्कीच चुकले आहे. त्यामुळे तीही शांतच होती.
"अगं आई , तू असे का करते आहेस गं ? सार्थकच तर तो मुलगा आहे ना ज्याच्याशी मला लग्न करायचे आहे आणि म्हणूनच तर त्यांना बोलावले आहे ना मी इथे तेही तुमच्याच सांगण्यावरून... मग आता काय झाले?"
" काय ? या सार्थकशी लग्न करायचे होते तुला? "
" होते नाही करायचे आहे . मग तुला काय वाटले ?"
" हिने मला निहालबद्दल सांगितले होते म्हणून तर आम्ही तयार झालो होतो...तूच सांगितले होते ना गं? पण मग हा काय प्रकार आहे ?"
आईने आपल्या सुनेकडे पाहत दोघीनांही जाब विचारला. निहालचे नाव ऐकताच निर्वी जितकी चकित झाली ती तितकीच चिडली सुद्धा?
" निहाल ? ते कसे शक्य आहे ? आणि हा विचार तर मी स्वप्नात देखील करू शकत नाही. "
"आणि मी तुला या गर्विष्ठ बाईच्या घरी नांदायला पाठवेन असा विचार तू आता स्वप्नातदेखील करू नकोस."
आईला राग आता अनावर होत होता. निर्वीची स्थिती सुद्धा सारखीच होती. आणि हे पाहून वहिनी पार घाबरून गेली होती.

बाहेर पाहुण्यांसोबत स्वतःही झालेल्या प्रकाराबद्दल अलिप्त असलेल्या बाबांना आतली कुजबुज ऐकू येत होती.
" काही प्रॉब्लेम आहे का ?"
सार्थकच्या बाबांनी प्रश्न केला. काय सुरु आहे ते पाहण्याकरता बाबा आत आले. घडला प्रकार आईने एका झटक्यात तिच्या शब्दांत वर्णन करून सांगून टाकला. बाबांसाठीही ही गोष्ट गोंधळात टाकण्यासारखीच होती . पण ती वेळ असे भांबावून जाण्याची नव्हती हे त्यांनी एका क्षणात हेरले आणि धीम्या आवाजात पण ठामपणे त्यांनी तिघींना बजावले,
" आता घडले ते घडले. त्यावर चर्चा करत बसण्याची ही वेळ नाही. बाहेर पाहुणे ताटकळत थांबून आहेत. आपल्या चुकीमुळे त्यांना असे सोडून इथे येणे मला ठीक वाटत नाही. मी बाहेर त्यांच्याकडे जातो. तुम्हीसुद्धा २ मिनिटांत मला तिथे हजर हव्या आहात. त्यांना आपण आमंत्रण दिले आहे तर कार्यक्रम करावाच लागेल. पुढचे पुढे बघू"
आईचे बोलणे क्षणभरही ऐकून न घेता आणि इतर कुणाकडेही न पाहता बाबा तडक बाहेर निघून गेले.
"आपले तर या घरात कोणीच काही ऐकत नाही . बाईसाहेब, चला आता. घातलेला गोंधळ निस्तरायला तर हवा आता."
 आई दुःखी कष्टी होत उभी राहिली आणि नाराजी दाखवत हात झटकून त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. वहिनी नेहमीप्रमाणे हात मुठीत धरून तशीच उभी होती. तिलाही काय करावे ते सुचत नव्हते. तिच्यामुळे झालेला गैरसमज आणि त्यामुळे उडालेला हा गोंधळ आता प्रकर्षाने तिला जाणवत होता. पण माफी मागण्याची सुद्धा आता सोया उरली नव्हती. आणि माफी मागायची तरी कुणाची हा सुद्धा एक प्रश्नच. "
अशा विचारांतच हरवून गेलेली असताना निर्वी मात्र पुन्हा एकदा चेहऱ्यावर हास्य पांघरून दरवाजाच्या दिशेने निघाली. तिच्यापाठोपाठ वाहिनी बाहेर आली. 
निर्वीला पाहताच सार्थक पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. त्या पिवळ्या साडीमध्ये ती एखाद्या सोनपरीसारखी भासत होती त्याला. त्यानेच गिफ्ट केलेले नाजूक सोनेरी डूल मंद लयीत डुलत होते. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर मात्र किंचित देखील कौतुक नव्हते. पण तरी त्यांनी निर्वीला जवळ बोलावून शेजारी बसवले. इकडची तिकडची चौकशी करत बराच वेळ होऊन गेला. खूप गप्पा झाल्या पण त्यांत देशमुखबाईंचा श्रीमंती आणि परदेशातून आलेला मुलगा या बद्दलची घमेंड प्रकर्षाने जाणवून येत होती. त्याचे वडील अधून मधून सर्व सांभाळण्याचा आव आणत परंतु या सर्वाचा बराच परिणाम निर्वीच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आणि निर्वी -सार्थक ? त्यांना तर कशाचे भानच नव्हते. आणि या सर्वाची साक्ष बनून वहिनी तिथेच गुमान उभी होती. 
बोलता बोलता मिस्टर देशमुखांनी विषय काढला ,
"खरेतर सार्थकसाठी कितीतरी उच्चशिक्षित , श्रीमंत मुलींची स्थळे गेला २ वर्षांपासून येत होती . दिसायला तर एकापेक्षा एक. तसा सार्थकसुद्धा कुठे कमी नाही ना? पण आम्हाला वाटले त्याला इतक्या लवकर लग्न करायचे नसेल म्हणून आम्ही कधी विषयच काढला नाही . पण गेल्या आठवड्यात इथे आल्यावर हा असा अचानक या दोघांच्या प्रकरणाबद्दल सांगू लागला तेव्हा तर आम्ही थक्क झालो . पण शेवटी आमच्यासाठी'त्याचा आनंद महत्त्वाचा ... आणि तुम्हीही बोलावून घेतले तेव्हा आज भेटण्याचा बेत आम्ही आखला. "

काहीसे चेहऱ्यावर हसू आणत निर्वीचे बाबा त्यांचे बोलणे ऐकत असतानाच देशमुख बाईंनी मध्येच नाक खुपसले. 
" हो ना . अगदी धक्काच दिला हो याने तर आम्हांला . पण काय करणार? तशी तुमची निर्वी बरी आहे. आम्ही शोधलेल्या सर्वपरीने कितीतरी चांगल्या होत्या पण शेवटी ज्याची त्याची आवड, नाही का? आणि जर आता त्याचीच इच्छा असेल तर आम्हाला पुढे जायला हरकत वाटत नाही.आम्ही इतर सर्व विसरून आनंदाने या लग्नात सामील होऊ.  फक्त लग्न आमच्या पद्धतीत मोठे थाटामाटात व्हावे अशी आम्हा दोघांचीही इच्छा. एकुलता एक मुलगा आहे हो हा आमचा . "

कार्यालयात साधी नोकरी करणारे निर्वीचे बाबा यावर निरुत्तरीत झाले . परंतू , निर्वीची आई मात्र शांत राहिली नाही . 
"खरे आहे ताई तुमचे . तास धक्का तर आम्हांलाही आमच्या निर्विने दिला आहे. तुमचे सर्व रास्त असेलही पण निर्वीदेखील अजिबात कशात कमी नाही. आमच्या जातीमध्ये तर कितीतरी जण कधीपासूनच मागे लागलेत. एकापेक्षा एक... हिने पण अजून काही पाहिले नाही म्हणून तर हे सर्व इथवर पुढे गेले आहे .  पण आम्ही तुमच्यासारखा लगेच निर्णय घेऊ शकत नाही . २ दिवसांत कळवू आम्ही .तुम्ही येऊ शकता आता . "
गोदावरीबाईंच्या बोलण्यातली नाराजी त्या तिखट वाक्यातून सहज उमटत होती. निर्वीला मनातल्या मनात आईबद्दल राग येत होता . कारण सार्थकच्या प्रेमात आता ती पूर्णपणे विलीन झाली होती. सार्थकच्या आईबाबांसाठी अशाप्रकारचा नकार हा एक दुसरा धक्का होता . ते पुढे अधिक काळ न घालवता निरोप घेऊन तडक तिथून निघाले . हे असे काही होईल याची कल्पनाही सार्थकने केली नव्हती म्हणून तोही नाईलाजाने त्यांच्या पाठोपाठ निघून गेला. सर्व पाहुणे अशाप्रकारे निघून गेल्यावर निर्वीच्या आईला बोलण्यासाठी रान मोकळे झाले आणि ती पुन्हा पुन्हा निर्वी कशी चुकली हे सर्वांना सांगू लागली. बाबा तर अजूनही वेगळ्याच चिंतेत होते. निर्वीलाही आता राग अनावर होत होता . पण ती काही न बोलता तिच्या खोलीत रडत निघून गेली. आईच्या तोंडाचा पट्टा अजूनही सुरूच होता हे पाहून आतापर्यंत शांत असलेले बाबा कडाडले ,
" खूप झाले आता. विषय संपला आहे तेव्हा रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागा जरा ."
आणि लगेच गोदावरीबाईंनी आपला मोर्चा वहिनीकडे वळवला.
 "सुनबाई , ऐकलेस ना ? चला आता कामाला.हा सर्व जो गोंधळ आज घडला तो फक्त तुझ्यामुळे . नीट ऐकले नाही ...समजून घेतले नाहीस ... अर्धे अधिक काहीतरी ऐकून स्वप्नात गुंतवले आम्हांला आणि प्रत्यक्षात विचित्रच घडत होते मागे."
खरेतर आईंच्या बोलण्यात चूक नाही हे सरितालाही चांगलेच ठाऊक होते आणि तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटतही होते . तिची चूक केव्हाच तिच्या लक्षात आली होती. पण तरीही तिच्या मनात जे काहूर माजले होते ते फक्त आणि फक्त निर्वीच्या भविष्याला घेऊन . आज जेवताना सर्वांच्या चेहऱ्यावर एकच  प्रश्न दिसत होता, 
"आता पुढे काय ? "

-रुपाली ठोंबरे. 

                                           (भाग १२ वाचण्यासाठी )

Thursday, April 23, 2020

एक पुस्तक...जणू भरलेलं आभाळ


पान पान भरल्या आभाळी  
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे

अक्षरमोत्यांची कृष्ण-पागोळी
बरसत विचारांचे ओघ सारे
रंगांचे कधी कवडसे सांडले
इंद्रधनू-चित्र बोलके मग उमटले

किती शब्द अन किती ओळी
ओंजळीत झेलले बोधक सारे
काय सुटले अन काय गवसले
हिशेब नाही खऱ्या सुखांचे

क्षोभ कधी तर कुठे प्रीत कोवळी
पर्व वाचले मनात साठले 
भावनांचे कवन खोल दाटत गेले
वाचूनि वेचले...वेचूनि साचले
साचूनि मग घडले...
घडले मी,अन घडवत गेले...शब्दांच्या ओळी
शब्दांच्या ओळी...सकाळ-सायंकाळी 
रोज नवी रांगोळी भरल्या मनाच्या द्वारी 

पान पान भरल्या आभाळी
सावळी वर्ण पाखरे
स्वारस्याचे थवे आगळे
मनामनांचे आरसे

- रुपाली ठोंबरे. 



Friday, April 17, 2020

अविष्कार .


रात के ग्यारह बज गए।  काली अँधेरी रात तारोंकी चादर ओढ़े धरतीपर छाँ गयी थी।  ठंडी हवा के झोंकेसंग आती प्रवेशद्वार पर बिछाये मधुमालतीके फूलोंकी सुगंध मन को महका रही थी।  जैसे वोह आहट दे रही हो कि 'रुपाली,अब बहुत रात हो चुकी हैं।  सो जाओ। " अब घर में सब लोग सो चुके थे। बेटेके सो जानेका यकीन होतेही मैं चुपचाप उस कमरे की ओर बढ़ी। दो दिनसे भलेही मैं घर के कामोंमें लगी पड़ी हो पर ध्यान सिर्फ इस कमरे की ओर था। एक ऐसा कमरा... जहाँ अक्सर मेरे सिवा किसी औरका जाना-आना होताही नहीं था। पर मुझे इस कमरेसे एक खास लगाव था... हमेशासेही।  

कमरेकी नजदीक पहुँचतेही मैंने धीरेसे दरवाजा खोला।  कमरेमें चारों तरफ घनघोर अँधेरा फैला हुआ था। पर खिडकीके कोनेसे आती रोशनीके एक किरनके लकेर में मैंने उसको देख लिया।  परसो मेरे साथ ही वोह घर आया था | और जबसे आया तबसे  कमरेमें बंद करके रखा गया था। पर उसने एक उफ्फ तक नहीं की थी।  मैं उसको देखते हुए ही आगे बढ़ी और लाइट्स  शुरू कर दी।  पल में अँधेरा रोशनीमें समाँ गया और कमरेकी चारों दीवारें रोशनीसे चमक उठी।  कमरा हमेशा की तरह थोड़ी बिखरी स्थिति में ही था।  पर मैंने बिना किसी और चीज़ की तरफ ध्यान दिए सीधे जाकर उसके सामने खड़ी हो गयी।  वोह मेरी तरफ ही देख रहा था। मैं भी चारों ओरसे उसको निहारती रही। ... जाने कितनी बार। वोह थोड़ा सहमा हुवासा था। थोड़ा डर भी नज़र आ रहा था उसके चेहरेपर, न जाने अब ये क्या करनेवाली होगी। आखिर आज उसका भविष्य मेरेही हाथोमें लिखा था। डर तो मुझे भी लग रहा था। पर उससे कहीं ज्यादा  उत्सुकता थी। कुछ लगावसा हो गया था उसके साथ।मेरा एक अनुरागही था जिसके कारण वोह मेरे साथ था। आज मैं उसपर अपने मन के सारे रंग लुटा देना चाहती थी। मैं न कोई बड़ी चित्रकार थी नाही मूर्तिकार लेकिन आज मैं उसको एक नया रूप देनेवाली थी। मैं और आगे बढ़ी। मैंने अपना हाथ उसके चेहरेपर रखकर संवारना चाहा , तब एहसास हुआ की कितनी कठिनाईयोंका सामना करके वोह यहाँ मेरे पास पहुंचा था। आज मुझे सिर्फ मुझे उसके साथ सही न्याय करना था। वोह आशासे सिर्फ मुझे देखे जा रहा था। उसकी चेहरेपर और कोई भाव नहीं था । वोह पत्थर के मुरत जैसे बिना पलक झपके सिर्फ देख रहा था। यह देखते न जाने क्यू ,मेरे चेहरेपर एक पलके लिए मुस्कान आयी। मैंने आगे चलते कमरे की खिड़की खोल दी। आसमान में पूनम का चाँद खिला हुआ था। बदलोंमें से वोह भी हमें निहार रहा था...आज वह रात , वोह चाँद सारे गवाह बनने वाले थे एक खुबसुरत लम्हेके । 

कमरे के एक कोनेवाली अलमारीसे कुछ पुरानी किताबें हाथ लगी। जमीं धूल साफ करते मैं उसके पास वापस आयी। कितनी देर तक पन्ने पलटती रही। उसकी तरफ नज़र जाती तो और कुछ सोचने लगती। पर उसको किसी चीजका फरक नहीं था। वोह सिर्फ मेरी हलचल देखे जा रहा था। न कुछ बातें ना कोई हरकत। बड़ी देर बाद कुछ सोचकर मैंने पहला निशान उसके चेहरेपर बनाना चाहा। पर कुछ गलत हुआ। उसका गिरा चेहरा सब बयान कर रहा था। पर झटसे मैंने संभाल लिया उसको भी... और अपने आपको भी। सारे बनाये निशान मिटा दिए। वह फिर खिल उठा नयी तमन्ना के साथ। मैनेभी कुछ सोचा और बड़ी आत्मविश्वास के साथ आगे बढ़ने लगी। लाल, हरा ,पीला ऐसे अनेक रंग अलग अलग घोल दिए गए। और फिर शुरू हो गयी एक नयी अनोखी होली। एक के पीछे एक अलग तरहोके रंग मैं उसपर बरसाने लगी। वोह भी हर रंग के साथ अपना रूप बदलता गया। मेरी हर क्रियापर उसकी प्रतिक्रिया आती रही और फिर खेल और गहरा होता गया। मेरी हर स्पर्शसे वोह चहक उठता। उसकी हर खुशीको देखकर यहाँ मैं भी फूली न समाँती। एक अनोखा खेल चल था उस बंद कमरेमें। जिस समय पूरी धरती गहरी नींद के सायोंमें सपनोंमें लिपटी सो रही थी...पर यहाँ मैं, उस वक्त किसी रातरानी की तरह मगन हो गयी थी अपने बुने हुए सपनोंको हकिकतमें उतारने के लिए। बिना कुछ कहे मेरी कल्पनायें , मेरी ख़ुशी , मेरे सपने ,मेरा मन, मेरी भावनायें सामने खड़े चेहरेपर मैं चित्रित करे जा रही थी। नये रंग ,नयी छटाएँ, नए आकार ... सबकुछ नया था बिलकुल पहली बार... हम दोनोंके भी लिए। मैं नशेमें अपना हर रंग उसपर न्योछावर करे जाती और वोह उस हर रंगको झेलते हुए पलपल मेरा साथ देता इन रंगोंकी दुनिया में खुदको समाये लेता गया। पल....घंटा...प्रहर...समय बीतते चले जा रहा था। मैं सबकुछ भूलकर कहीं खो गयी थी। 

पर कहिना कही रुकना पड़ता है ना? किसी सूंदर अविष्कार के लिए ठीक समय, ठीक जगह रुकना भी ज़रूरी होता है। इन सब सोच में मैं डूबी थी। तभी अचानक दूरकी मस्जिदसे अजानके स्वर कानोंपर पड़े वैसे मैं तुरंत उठ गयी। खिडकीकी ओर चलती गयी। बाहर नज़ारा पूरी तरह से बदल चूका था। रात का अँधेरा अभी सुरजकी रौशनी की चपेटमें आकर गायब हो गया था। सामनेवाली पहाडीके बीचमें से निकलते सूरज की किरने एक नयी सुबह का इशारा दे रही थी। आँगन में गिरे पारिजातकी खुशबूसे सारा समाँ महक उठा था। पंछी चहकते हुए आकाशमें उड़ान ले रहे थे।  और आकाश... वह तो अब रंग चूका था। मानो रात के काले पन्नेपर किसी महान चित्रकारने अपनी कलाकारीसे सारे रंग भर दिए हो और ये सृष्टीका और एक नया अविष्कार सामने आया हो। लेकिन यह अविष्कार मैंने पहलेभी कहीं देखा था। कहाँ ?सोचते सोचते कमरे में वापस आयी। आकर फिरसे उसके सामने खड़ी हुयी तब एहसास हुआ ,वोह अविष्कार तो यहाँ मेरे सामनेही हैं जो कल रातभर मेरा साथ देता रहा... ये वोही कॅनव्हास... मेरी रंगोंकी बौछार से सुंदरता की सीमा पार कर गया हो। 

आज... इस समय भी वोह बड़ी शानसे सामने खड़ा है.... एक मौन संवाद करते हुए। उस बंद कमरेसे निकलकर यहाँ कला दीर्घा (आर्ट गैलेरी )में प्रवेश कर वह खुदको काफी खुशनसीब समझ रहा है। ख़ुशी से पागल हो गया हो।  और क्यों न हो ? आज वोह सिर्फ सफ़ेद, मौन कॅनव्हास नहीं है तो एक कहानी बयान करता चित्र बन चूका हैं। 

पल....मिनिट...घंटोंतक ... वोह मुझे और मैं उसको निहारती रही। पर आज उस नज़र में कृतज्ञता , संतुष्टि, पूर्ति छुपी हुयी थी जो मुझे नि:सन्देह नज़र आ रही थी और शायद उसको भी। 


- रुपाली ठोम्बरे

Monday, April 6, 2020

सगळीकडेच हाहाकार !


" अरे, आज अचानक काय झाले काही समजलेच नाही. एकाएकी सभोवताली अंधार दाटून आला. वेळ पाहिली तर अजून ही तर माणसांची झोपण्याची वेळ नाही. पण तरी सर्व लाईट्स बंद झाले.आणि एका क्षणात पुन्हा तोच सभोवताल दिव्यांनी झगमगून निघाला. नक्की काय सुरु आहे ?"
जमलेल्यांपैकी एकाच्या या प्रश्नावर दुसरा लगेच उत्तरला ,
" अरे , या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला दिवे लावून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवण्यास सांगितले होते. तेच सध्या सुरु आहे."
"अरे पण इतकी एकता आहे या देशात ? तर मग आपला निभाव लागणे अशक्यच, नाही का ?"
जमलेल्या कोरोना विषाणूंच्या घोळक्यातून त्यांचा म्होरक्या पुढे बोलू लागला .
" हो ती चिंता आहेच. किती आशेने आपण सर्व या देशात आलो होतो. पण काय झाले ? आपण हातपाय पसरवायला सुरुवात करताच मध्येच एके दिवशी अचानक रस्त्यांवरून लोकच गायब झाली. दिवसभर मानवी शरीर मिळालेच नाही त्यामुळे आपल्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर टाळ्या , थाळ्या वाजवून किती तो नाद घुमला आसमंती.पुढे देशात अगदी २१ दिवसांचा लॉकडाऊन. मंदिरे , दळणवळण सारे सारे थांबले आपल्याला थांबवण्याकरता . देशातला प्रत्येक नागरिक जमेल तशी मदत करत आहे.हे सर्व पाहून एक वेळ वाटले आता तर इथून काढता पाय घेतला पाहिजे. "
" पण असे अनेक मूर्ख लोक पण आहेत याच देशात ज्यांना अजून आपल्या शक्तीची प्रचिती आली नाही . म्हणूनच ते कुणालाही न जुमानता खुशाल बाहेर पडत आहेत."
" आणि हो सध्या तसेच काही जण आपल्या हाती लागत आहेत . "दुसरा आनंदाने उद्गारला.
" अगदी बरोबर . तेच म्हणत आहे मी. पण ते फार काळ टिकणार नाही . इथले प्रशासन अजून कठोर कारवाई सुरु करतील आणि त्यांनाही वठणीवर आणतील. इथे येण्याआधी वाटले होते कि इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश. अगदी सहज हरवू शकणार पण याला . पण कुठेतरी ते भाकीत खोटे ठरत आहे."
आपल्या म्होरक्याच्या बोलण्यावर एक कोरोना चिंतेच्या स्वरात उत्तरला ,
" मग आता ?"
तसा त्यांच्यातील एक ज्येष्ठ कोरोना म्हणाले ,
"आता काय ? आपल्याला वाट पाहावी लागणार येथील काही देशद्रोह्यांकडून एखादी चूक झाली तर. पण मला आता तशी शक्यता कमीच  वाटत आहे . इथले शासन , प्रशासन आणि जनता सुद्धा न हरणारी आहे,जिद्दी आहे .फक्त आपणच नव्हे तर जातीवाद', धर्मवाद ,राजनीती, गरिबी  असे  इतर अनेक शत्रू या देशात कायम वावरत असतात आणि अजूनही आहेतच, पण तरी त्यांचा विश्वास ठाम आहे. आपल्या विरोधात लढाई सुरु केली आहे तर यात विजय मिळवणारच अशी शपथच घेतली आहे जणू. एका उत्कृष्ट  नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र बांधले जात आहेत.समाजातील एका वर्गावर आपण आक्रमण केले तर लगेच दुसऱ्या वर्गातील लोक विविध तऱ्हेच्या सहकार्य करत धावून येतात . आपण लोकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे लक्षात येताच आजचे प्रकाशपर्व उदयास आले. ज्यामध्ये एक नवी ऊर्जा मिळाली आहे या देशाला. अजून काही दिवस उरले आहेत. तोपर्यंत जर कोणीच बाहेर पडला नाही तर मानवी शरीरांअभावी आपले अनेक कोरोना नष्ट होतील. मग त्यापूर्वीच इथून पाय काढलेला बरा. तुम्हाला काय वाटते ?"
आपल्या पेक्षा वयाने मोठया असलेल्याचे असे विचार ऐकल्यानंतर तो म्होरक्या पुढे म्हणाला ,
" काही दिवस पाहू काय होते आहे ते ? हे लोक जर असेच घरामध्ये राहिले तर इथे आपला टिकाव लागणे कठीणच . मग तेव्हा आपल्याला इथून निघून जावेच लागेल. इथे सर्वांचे प्रयत्न पाहून मला तरी आता वाटू लागले आहे कि आपण या युद्धात हरू. तरी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे लोक आपल्याला मदत करतीलच . कदाचित जर तोच  माणूस शहाणा झाला नाही तर आपला निभाव लागणे शक्य होईल.नाहीतर आपले काही खरे नाही. आपण हरणार आणि भारत जिंकणार ."
बघा , त्यांच्याही जगतात तेही मानत असतीलच कि माणसाचे घरामध्ये राहणे हाच त्यांचा विनाश आहे. मग ही साधी गोष्ट आपल्याला का बरे कळू नये.कोरोनाला हरवायचे असेल तर आपण एका ठिकाणी थांबलेच पाहिजे अन्यथा सर्व काही कायमचे थांबून जाईल . लॉकडाऊन चे काही दिवसच उरले आहेत. तेव्हा सर्व नियमावलींचे काटेकोर पालन करूया. घरीच राहूया ... स्वच्छता बाळगूया... विनाकारण घराबाहेर पडणे टाळूया...डॉक्टर आणि पोलिस यांच्याबद्दल आदर दाखवूया ... घरातल्यांबरोबर नेहमी मिळत नाही तो वेळ आता मिळाला आहे . तो आनंदात घालवूया... आणि स्वतः सुरक्षित राहून देशाला वाचवूया ... कोरोनाच्या विळख्यातून या जगाला वाचवूया .

- रुपाली ठोंबरे. 

Saturday, April 4, 2020

This Too Shall Pass


आज तब्बल १२ झालेत माणूस आपल्याच घरात अडकून पडला आहे पण कशासाठी ? तर स्वतःला आणि आपल्याच प्रियजनांना एका कोरोना नामक राक्षसी शक्तीपासून वाचवण्यासाठी. एकमेकांपासून दुरी हा एकमेव उपाय आहे याला आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा. काही मूर्ख अपवाद वगळता देशातला प्रत्येक जण या २१ दिवसांच्या लॉक-डाऊनमधिल नियमांचे अगदी काटेकोरपणाने पालन करताना दिसत आहे. खरेतर विशेष कौतुक वाटते ते लहानग्यांचे. दिवसभर शाळा , थोडा अभ्यास त्यानंतर खेळ असा त्यांचा साधारण नियमित दिनक्रम... मजामस्ती करत अक्खा दिवस कसा पार पडतो हे त्यांनाही कळत नाही. या रोजच्या कार्यक्रमात एक- दोन दिवसांत येणारी सुट्टी म्हणजे आनंदच आनंद . पण हा सर्व आनंद लॉक-डाऊनमध्ये मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि खरंच फार कठीण आहे तासभरही एका ठिकाणी शांतपणे न बसणाऱ्यांना असे १० दिवस घराबाहेर जाऊ नकोस असे सांगणे आणि त्यांनीही ते समजूतदारीने पाळणे. नोकरीधारकांना ऑफिसमध्ये जाण्यास मनाई असली तरी वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून थेट ऑफिसच त्यांच्या घरी अवतरलेले दिसते. या सर्वातून वेळ काढत आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे हेही एक कौशल्यच.

आमच्या घरी सुद्धा काहीसे असेच दृश्य... ५ वर्षांचा ओम शाळेतील परीक्षा रद्द होऊन १५ तारखेपासूनच घरी. सुरुवातीला कोरोनाचे इतके प्रस्थ मुंबईत वाढले नव्हते त्यामुळे दिवसभर खाली गार्डन मध्ये मुलांचा नुसता हल्ला-गुल्ला. पण हळूहळू हे चित्र बदलत गेले. वातावरण अधिक गंभीर होत गेले. सोसायटीच्या आतमध्ये सुद्धा वर्दळ विरळ होत गेली. मग घरातल्या घरात मुलांना रमवण्याचे प्रयत्न सुरु झाले. सारे बैठे खेळ मांडले गेले... कधी चित्रकला कधी आणखी काही. या दिवसांत ओमची एका खेळासोबत खास मैत्री जमली. जगाच्या नकाशावर देशांचे कोडे आणि त्यानंतर त्या परिपाटावर वेगवेगळ्या देशांच्या झेंड्याची अचूक मांडणी. तासनतास या खेळात तो रमून जायचा. सुरुवातीला आजी, आबा, मी ... सर्वांकडून  मदत घेऊन तो ती मांडणी पूर्ण करायचा पण नंतर आमच्या शिवायच तो खेळ पूर्ण होऊ लागला . दिवसेंदिवस कोरोनाच्या बातम्या वाढू लागल्या. इतर देशांचे बदलते रूप पाहून आपल्या देशात असलेली 'सोशल डिस्टन्सिंग' ची निकड अधिक तीव्रतेने जाणवू लागली. रोज टीव्हीवर जगाच्या नकाशावर कोरोनाग्रस्त देशांचे गणित आणि समोर ओमच्या खेळातील तेच सुंदर देश... या सर्वाला पाहता पाहता एक कल्पना सुचली...आणि जन्म झाला एका नव्या कलाकृतीचा.

खरेतर सगळीकडे पहिले तर कोरोनाची भीषणता , त्यामध्ये हतबल झालेले देश, काय करावे आणि काय करू नये याबद्दल जनजागृतीकरण ... असेच काहीसे दृश्य. मी काही वेगळे करण्याचे ठरवले. 'The Secret' मध्ये सांगितल्याप्रमाणे जितका सकारात्मक विचार करू तितके चांगले घडू शकेल हा विचार डोक्यात आला आणि जगाच्या येणाऱ्या नव्या भविष्याचे रूप डोळ्यांसमोर आले... नक्कीच कोरोनाच्या हल्ल्यानंतर मुक्त झालेली पृथ्वी,जनजीवन अगदी लगेच पूर्वस्थानावर येणार नाही पण तरी या कोरोनापासून भविष्यात मिळवलेली दुरी हे एक खूप मोठे यश असेल. दिवसभर कंटाळून सर्वांना त्रस्त करणाऱ्या ओमलाही मी यात सामिल करून घेतले. झेंड्यानी पृथ्वीवरील जनजीवन दाखवणे हि काहीशी त्याची कल्पना. मागे 'डॉट टू  डॉट ' या माझ्याच प्रदर्शनाच्या वेळी बिंदू , वर्तूळ यांबद्दल मनात विशेष रुची. शिवाय पुथ्वी गोल...या भयानक विषाणूचा आकार गोलाकारच. सर्व काही अगदी छान जुळून येत होते. नकाशातील प्रत्येक ध्वजांचे रंगकाम म्हणजे फार वेळ घेणारे आणि तितकेच महत्वाचे. ती पूर्ण जबाबदारी ओमने स्वतःच्या खांद्यांवर घेतली. मी फक्त झेंडे काढून दिले पण त्यांना खरे रूप दिले ते याच चिमुकल्यानेच. अगदी कोणता देश कोणत्या दिशेला .आसपासचे देश कोणते . त्यांचा आकार ... हे सर्व लक्षात घेऊन सर्व मांडण्याचा त्याचा आग्रह . किती उत्साह आणि धीर होता तेव्हा त्याच्यामध्ये. उरलेल्या जागेत आम्ही डोंगर आणि जंगलांचे दर्शन घडवले. महासागरांचे निळे पाणी दृष्टीक्षेपात आले आणि चित्रातली पृथ्वी आपलीशी वाटू लागली . ओमला तर भारीच मज्जा येत होती. पृथ्वी हे एक जग आणि कोरोना विषाणू ये दुसरे... ते विषाणू आपल्या मातीवर उतरले आणि संपूर्ण दुनियेत हाहाकार झाला. डॉक्टर्स , नर्सेस दिवसरात्र प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. शासन , प्रशासन आणि जनता सर्वच एकीने लढत आहेत. या सर्वाना नक्कीच यश मिळेल. आणि हा विषाणू पृथ्वीपासून कितीतरी दूर जाऊन पडेल. आणि पुन्हा येण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला शिरकाव करण्यास वाव मिळणार नाही एवढी सोशल डिस्टन्सिंग निर्माण झाली असेल या दोन जगांत. तीच पोकळी निर्माण केली आहे आम्ही दोघांनी. दिवसभर सगळीकडे कोरोना कोरोना पाहून मुलांच्याही मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. कोणी भाजीपाल्यासाठी बाहेर जाऊ लागले कि अडवतात कि "बाहेर कोरोना आहे.नका जाऊ." चित्रातील कोरोनाची मालिका काढत असतानाही ओम विशेष काळजी घेत होता कि चुकूनसुद्धा त्याचा स्पर्शही नको आपल्या पृथ्वीला.

आणि खरेच हेच भविष्य आज जगातील प्रत्येक देश, प्रत्येक माणसाला लवकरात लवकर हवे असेल. हेच त्याचे स्वप्न असेल ... "Today's World's Dream "... म्हणजे "आजच्या जगाचे स्वप्न" जे लवकरात लवकर हकिकतेत उतरावे हीच यावेळी एकमेव प्रार्थना.जरी काही कारणांमुळे यावर पूर्ण मात करता आली नाही तरी त्यातून बरेच काही शिकून पुढे सावधानता बाळगणे केव्हाही उत्तम.हे एक जगमान्य सत्य  आहे कि जगात अशी कोणतीच परिस्थिती नाही जी कायम टिकून राहील ... वेळ ही सतत बदलत असते . आज दुःख आहे तर उद्या सुख नक्कीच वाट्याला येईल. परंतु अशा बिकट प्रसंगी गरज आहे ती संयमाची आणि धीराची . विचार सकारात्मक ठेवा ... घरीच राहा ... शक्यतो घराबाहेर अधिक पडू नका... नियमांत राहून आजही आणि सर्व ठीक झाल्यावरही जमेल तेव्हढी मदत करण्याचा प्रयत्न करा ... म्हणजे नक्कीच हे  जग अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्यास सक्षम ठरेल यात कणभरही शंका नाही.आणि आपणा सर्वाना हेच हवे आहे. हो ना ?
या कोरोना नामक सूक्ष्म परंतू अतिभयानक राक्षसांपासून या मानवजातीला वाचवायचे आहे.
त्याला हरवायचे आहे आणि आपल्याला जिंकायचे आहे .
पण हे एकट्या मनुष्याच्या हातात अजिबात नाही. म्हणून शरीराने दूर राहूनही मानाने मात्र एकत्र येऊ.
एकत्र लढूया म्हणजे विजय आपल्याच हातात आहे.


- रुपाली ठोंबरे    

Blogs I follow :