Monday, July 27, 2015

दो दवांत जगून घे पाऊस सारा




कधी कधी एखादी गोष्ट मिळणार नाही ही वस्तुस्थिती माहित असूनही माणसाचे मन तिच्याच स्वप्नांत, तिच्या अवतीभवती अडकून राहिलेले असते.कधी कधी ते स्वप्न पूर्ण होणारा क्षण त्या माणसाच्या जीवनात उलटूनही गेलेला असतो. तरी ते मिळणार याची वाट पाहत तिथेच थांबून राहतो.एकाच ध्येयाचा ध्यास लागणे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे . त्यासाठी सतत नवनव्या मार्गांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे. पण त्यासाठी पूर्णपणे थांबणे, निराश होणे हे कोणत्याच उद्दिशाच्या पूर्ततेसाठी कामी येत नाही . याउलट जीवनाचा एक नवा अध्याय नव्याने, नव्या उमीदीने सुरु करावा - खिन्नतेचा ढग दूर सारून उद्दिष्टांचा ध्रुवतारा दाखवणारा.


                


रे मना , ' ये घना '
साद का घाली असा
टळून गेली वेळ आता
अजून का तू उभा असा 

नभी न पसरला घनांचा पसारा
कधी न उलगडला मनाचा पिसारा
मिटून असाच वाट पाहत आहे
सण थेंबांचा येईल केव्हा असा

ढगाळ-काळे आभाळ सारे
मनात श्वास असे गुदमरावे
आठवांच्या गर्दीत आसवे
पावसात हळूच मुग्ध विरावे

धारांत भिजण्याची ओढ तुला
ताऱ्यांत निजण्याचा परिपाठ पुन्हा
रे मना , स्वप्नांना तू सोड आता
नवा सर्ग मार्ग नवा तू शोध आता

काहूर मनात फुलू दे आशांचा पिसारा
दिशांत शोध एक नवा किनारा
पूर्ततेची इहिता आनंदाश्रूंना थारा
 दो दवांत जगून घे पाऊस सारा

- रुपाली ठोंबरे.

2 comments:

  1. As always apratim kavita. loved it. sunder varnan kele ahes before start as well.

    ReplyDelete
  2. i really needed to read something positive about life .. just like a wandering thirsty boy was seeking for water and surprisingly he found the water ,i came to read this poem .. felt good after reading it ..

    ReplyDelete

Blogs I follow :